मुंबई : 10 ऑगस्टपासून जीवनाशी लढा देणाऱ्या राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीकडे सध्या सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सर्वांचा लाडका राजू श्रीवास्तव लवकर बरा व्हावा आणि डॉक्टरांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळावी, अशी प्रार्थना सर्वजण करत आहेत. राजू आता पूर्वीपेक्षा बरा असल्याची बातमी आहे. त्याला मृत्यूच्या मुखातून परत आणण्यासाठी डॉक्टरांनी सर्व शक्ती पणाला लावली होती आणि आता समोर आलेल्या बातम्यांमुळे दिलासा मिळणार आहे. आता राजू पूर्वीपेक्षा बरा असल्याचं सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भावाने दिली माहिती
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तव यांचा भाऊ दीपू श्रीवास्तव यांनी माहिती दिली आहे की, आता डॉक्टरांनी सांगितलं आहे की, त्यांना जो संसर्ग होत होता तो आता कमी झाला आहे. ते सध्या आयसीयूमध्ये आहेत पण त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्याच बरोबर, कुटुंब राजूसाठी कोणतीही कसर सोडत नाही. डॉक्टर राजू यांना उपचाराने बरं करण्याचा प्रयत्न करत असताना, राजूच्या प्रार्थना कमी पडू नयेत म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी घरी विशेष पूजा ठेवली आहे.


10 ऑगस्टला आला होता हृदयविकाराचा झटका
10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. केवळ त्यांच्या प्रशिक्षकानेच त्यांना एम्स रुग्णालयात नेलं, तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं होतं. राजू कोमात गेले आहेत, काही प्रमाणात त्याच्या मेंदूने काम करणं बंद केलं आहे. असं यापूर्वी सांगण्यात आलं होतं. पण आता त्यांच्यात हळूहळू सुधारणा दिसून येत असल्याची बातमी आहे. त्याचबरोबर केवळ चाहतेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.