मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट कपलपैकी एक असलेल्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची सगळीकडे चर्चा आहे. मात्र, अद्याप दोन्ही बाजूंकडून अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. पण काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात होता की, हे कपल या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये सात फेरे घेणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचबरोबर रणवीरची आत्या रीमा जैनने या बातम्यांना पूर्णविराम दिला आणि सांगितलं की असं काहीही होणार नाही, कारण हे घडलं असतं तर तिलाही याची माहिती मिळाली असती. या सर्व गोष्टींनंतर आता आणखी एक बातमी समोर येत आहे, जी ऐकून रणबीर आणि आलियाच्या चाहत्या आश्चर्याचा धक्का बसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचं लग्न 1980 मध्ये आरके हाऊसमध्ये झालं होतं. आपल्या आई-वडिलांप्रमाणेच रणबीर कपूरही लवकरच आलिया भट्टसोबत कपूर कुटुंबाचं वडिलोपार्जित घर असलेल्या आरके हाऊसमध्ये लग्न करणार आहे.


रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाला 450 लोकं उपस्थित राहणार आहेत. रणबीर कपूरचं कुटुंब एप्रिलच्या शेवटी लग्न करण्याचा विचार करत असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र अभिनेत्रीचे आजोबा नरेंद्रनाथ राजदान यांची प्रकृती बिघडल्याने आलिया भट्टच्या कुटुंबीयांना लवकरच लग्न करायचं आहे.



जेव्हा रणबीर कपूरचे दिवंगत वडील ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट 'शरमाजी नमकीन'चे प्रमोशन करत होता. त्यानंतर एका मीडिया हाऊसमध्ये आपल्या लग्नाच्या प्रश्नावर रणबीर कपूर म्हणाला होता, 'मला वेडा कुत्रा चावला नाही की, मी मीडियाला तारीख जाहीर करावी. पण आलिया आणि मी लवकरच लग्न करण्याचा विचार करत आहोत, आशा आहे की आम्ही लवकरच लग्न करू. असं रणबीर म्हणाला होता.