मुंबई : इंडस्ट्रीमध्ये असे अनेक किस्से आहेत, जे आजही चर्चेत असतात. त्यातील एक म्हणजे अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांच्यात असलेली केमिस्ट्री. आजही त्यांच्या नात्याची चर्चा कायम रंगताना दिसते. रेखा आणि बिग बींनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. त्यांची जोडी फक्त रिल लाईफमध्येच नाही तर, रिअल लाईफमध्ये देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. बिग बींवर असलेल्या प्रेमाखातर रेखा यांनी अनेक गोष्टींचा त्याग केला. एवढंच नाही तर एक दिवस आसा आला जेव्हा रेखा यांना सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीदरम्यान, अभिनेता आणि दिग्दर्शक रंजीत यांनी रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरबद्दल मोठा खुलासा केला. हा किस्सा आहे 'कारनामा' सिनेमा दरम्यानचा. ज्यामध्ये रेखा मुख्य भूमिकेत दिसणार होत्या. सिनेमाची शूटिंग सुरू झाली आणि रेखा यांच्या सवयीबद्दल रंजीत हैराण झाले. 


सिनेमाच शुटिंग सुरू झाल्यानतंर रेखा कायम संध्याकाळी शुटिंग करायला नकार द्यायच्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेखा त्या काळात अमिताभ बच्चन यांच्यासोबत वेळ घालवता यावा म्हणून त्या संध्याकाळी शुटिंगला नकार द्यायच्या. 


संध्याकाळ झाली की रेखा शुटिंग सोडून निघून जायच्या, अभिनेत्रीच्या रोजच्या वागणुकीला कंटाळल्यानंतर रंजीत यांनी धर्मेंद्र यांच्याकडे सल्ला मागितला. त्यानंतर धर्मेंद्र यांनी रंजीत यांनी रेखा यांना सिनेमातून काढून टाकण्याचा सल्ला दिला. 


दरम्यान, रेखा यांच्या वेळेच्या समस्यांमुळे, 'कारनामा' सिनेमात रेखा यांच्या ऐवजी अभिनेत्री अनिता राजला कास्ट करण्यासाठी सांगितलं. अखेर, शेवटी विनोद खन्ना आणि फरहा नाझ यांना घेऊन 'कारनामा' सिनेमा पूर्ण झाला.