मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेमकहानी जग जाहीर आहे. अजूनही त्याबद्दल चवीने बोलले जाते. यांच्या लव्ह स्टोरीमुळे अनेक विवाद ही झाले. अमिताभ बच्चन हे जया बच्चन यांच्यासोबत एक आनंदी आयुष्य जगच आहेत तर रेखा आजही एकटीच आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेखाच्या मनात आजही अमिताभ बच्चन यांचे खास स्थान आहे. आजही बिग बींची स्तुती करण्याची एकही संधी त्या सोडत नाहीत. नुकत्याच एका मुलाखती  रेखा यांनी बिग बींबद्दल मोठा खुलासा केला. 'मनाचा मोठेपणा' आणि 'नात्यांबद्दलची गंभीरता' या अमिताभ यांच्या दोन गोष्टी मला त्यांच्याकडे आकर्षित करायच्या. रेखा पुढे म्हणाल्या की, ''मोठा माणूस तोच असतो जो स्वत:साठी नाही तर दुसऱ्यांसाठी जगतो आणि अमिताभ यांपैकी एक आहेत. अमिताभ किती ही दु:खात असेल तरी ते नेहमी दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात.''


याच कारणामुळे अमिताभ यांनी कधी ही दुसरा विवाह केला नाही कारण त्यांना कधीच आपल्यामुळे इतरांना दुखवायचे नव्हते. ज्यावेळी रेखाशी लग्न करण्याचा प्रस्ताव घेऊन बिग बी आपल्या वडिलांकडे गेले होते त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना हेच समजावले होते की, तुझ्या एका निर्णयामुळे अनेकांचे आयुष्य उद्धवस्त होईल. बिग बी आपल्या वडिलांचे नेहमीच ऐकायचे त्यानंतर त्यांनी रेखा यांच्यासोबत असलेले नातं सपवण्याचा निर्णय घेतला. आजही अनेकवेळा जेव्हा बॉलिवूडमधल्या नात्यांबाबत चर्चा होते तेव्हा सगळ्यात आधी बिग बी आणि रेखा यांचे नाव आवर्जून घेतले जाते.


सध्या अमिताभ हे छोट्या पडद्यावर 'कौन बनेंगा करोडपती'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ते 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'मध्ये आमीर खानच्या वडिलांची भूमिका देखील साकारणार आहेत.