मुंबई : सलमान खान बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. त्याची फॅन फॉलोइंग भारतातच नाही तर जगभरात आहे. सलमान खानचा कोणताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर करोडोंचा व्यवसाय करतोच. साऊथमध्ये सलमानचे चित्रपट फारशी कमाई करत नसले तरी खुद्द भाईजानही या प्रकरणाने हैराण झाला आहे. अलीकडेच सलमान खानने पॅन इंडिया चित्रपट आणि चिरंजीवीसोबत त्याचा येणाऱ्या आगामी चित्रपटाबद्दल बोलला. यासोबतच हिंदी चित्रपटांमध्ये 'हीरोजम' का आवश्यक आहे, हेही या अभिनेत्याने सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी बोलताना सलमान खान म्हणाला की, तो चिरंजवीच्या आगामी 'गॉडफादर' चित्रपटात एक विशेष भूमिका साकारत आहे. याबद्दल बोलताना सलमान म्हणाला, "त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता. मी चिरू गारूला खूप दिवसांपासून ओळखतो. तो माझा एक चांगला मित्र आहे. तर त्याचा मुलगा राम चरणदेखील मित्र आहे.


त्याने RRR मध्ये अप्रतिम काम केलं आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि चित्रपटाच्या यशाबद्दल मी त्याला शुभेच्छा देतो. मला त्याचा खूप अभिमान आहे. तो खूप छान काम करत आहे आणि हे पाहून खूप अभिमान वाटतोय. पण दक्षिण भारतात आमचे चित्रपट चांगले चालत नाहीत हे पाहून मला आश्चर्य वाटत आहे."


यादरम्यान सलमान खान असंही म्हणाला की, त्यालाही दक्षिण भारतीय चित्रपट पाहायला आवडतात. त्याला अद्याप कोणत्याही चित्रपटाची ऑफर आलेली नाही. "जेव्हा ते माझ्याकडे येतात तेव्हा ते तामिळ किंवा तेलुगू चित्रपट आणत नाहीत. ते माझ्याकडे हिंदी चित्रपटांसाठी येतात," आगामी काळात तो कतरिना कैफसोबत 'टायगर 3'मध्ये दिसणार आहे.