मुंबई : समंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी चार वर्षांचं वैवाहिक जीवन संपवून एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनी घटस्फोटमागचं कारण अतिशय खाजगी ठेवलं आहे, त्यानंतर या एक्स कपलच्या नात्याबद्दल विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. एकीकडे, जिथे सामंथाने नागा चैतन्यकडून 200 कोटी रुपयांची मोठी पोटगी नाकारली आहे. त्याचवेळी, अभिनेत्रीच्या त्या टॅटूही खूप चर्चेत आहे, जो तिने तिच्या पतीसाठी तिच्या पाठीवर बनवला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॅटूमध्ये काय लिहिलं आहे जाणून घ्या ...
खरं तर, नागा चैतन्याच्या प्रेमात पूर्णपणे वेडा झालेली सामंथाने तिच्या एक्स पतीला समर्पित करून तिच्या बॉडीवर एक नाही तर तीन टॅटू बनवले होते. सामंथाच्या उजव्या बरगडीवर 'चाय' लिहिलं होतं. तिच्या मानेच्या मागच्या बाजूला, तिने तिच्या 'ये माया चेसावे' या पदार्पणाच्या चित्रपटाचा टॅटू काढला आहे. ज्यात ती नागा चैतन्यसोबत रोमान्स करताना दिसली होती. समंथा आणि नागाच्या नात्याची सुरुवात २०१० साली आलेल्या याच रोमँटिक ड्रामा चित्रपटापासून झाली होती.


अभिनेत्रीचा तिसरा टॅटू तिच्या उजव्या हातावर बनवला आहे. हे समंथाने नागासाठी कोरलेले टॅटू आहेत. जे तिने तिच्या पतीसाठी बनवले होते. जरी आपल्या जोडीदारासाठी टॅटू काढणं खूपच रोमँटिक वाटत असलं तरी आमचा विश्वास आहे की, कधीकधी असा निर्णय आयुष्यभर डोकेदुखी बनू शकतो.


याचं कारण असं की, दीपिका पदुकोण, हृतिक-सुझान आणि आता सामंथा रूथ प्रभू यांनाही त्यांच्या बॉयफ्रेंडच्या नावाचे टॅटू हातावर बनवले आहेत किंवा त्यांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी गोंदवलेले आहेत. जरी, काही दिवसांपासून तिचे टॅटू खूप ठळक होते मात्र आता याचा परिणाम सगळ्यांसमोर आला आहे.


ब्रेकअपनंतर टॅटू हा बनला विषय 
जेव्हापासून सामंथा रूथ प्रभूने नागा चैतन्य अक्किनेनीसोबत विभक्त होण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून प्रत्येकजण समंथाला तिचे टॅटू काढेल की, तसेच ठेवेल हे जाणून घेण्यास उत्सुक आहे. दीपिका पदुकोण देखील त्यापैकी एक आहे. जिने ब्रेकअपनंतर तिच्या टॅटूसाठी सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. दीपिका पदुकोणने रणबीर कपूरसाठी तिच्या पाठीवर आरकेचा सुंदर टॅटूही बनवला होता. जोपर्यंत हे दोघे प्रेमात होते, ते ठीक होतं, पण ब्रेकअपनंतर तो टॅटू चर्चेचा विषय बनला.