अनेक चित्रपटात काम केल्यानंतर संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या अफेयरचा चर्चेने इंडस्ट्रीसह चाहत्यांनाही धक्का बसला होता. कारण संजय दत्त तेव्हा विवाहित होता. या अफयेरचा परिणाम त्याचा वैवाहिक जीवनावरही झाला. धक्कादायक म्हणजे संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या अफेयरच्या चर्चा सुरु असताना संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्माही कॅन्सशी दोन हात करत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण नियतिला काही वेगळंच ठरवलं होतं. 1993 मधील मुंबई सीरियल ब्लास्टमध्ये संजय दत्तने हत्यार बाळगले म्हणून त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर संजय दत्तसोबत तिचा काही संबंध नाही असं माधुरी दीक्षितने सर्वांना सांगितलं. 
या घटनेपूर्वीच ऋचा यांना संजय दत्त यांच्या अफेयरबद्दल भनक लागली होती. ऋचा यांनी त्यांचं नातं वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले पण कालांतराने ते दोघे वेगळे झालेत. यांच्या या नात्यातील दुराव्यासाठी माधुरी दीक्षितला कारण मानलं जातं होतं. त्या वेळी माधुरी दीक्षितला घर मोडणारी म्हणून हिणवलं जात होत. त्यावेळी तर संजय दत्तची मेव्हणी रिचा चड्ढा हिने माधुरीवर अनेक गंभीर आरोप केलेत. 


नव्वदीच्या काळातील संजय आणि माधुरीची जोडी अतिशय लोकप्रिय होती. साजन चित्रपटानंतर त्यांच्यामध्ये जवळीक वाढली असं म्हटलं जातं. माधुरी कायम मुलाखतीत संजय दत्तची तारीफ करायची. त्याला फेव्हरेट पार्टनल असा उल्लेख करायची. ते दोघे लग्न करणार अशी चर्चा सुरु झाली. संजय दत्त ऋचाला घटस्फोट देणार असं म्हटलं जात होतं. कर्करोगासाठी ऋचा अमेरिकेत असताना तिला ही बातमी मिळताच ती परतली. पण विमानतळावर संजय दत्त तिला घ्यायला आला नव्हता. ती आजारामुळे खचली होती आता संजय दत्तच्या वागणुकीमुळे ती पूर्णपणे तुटली. 


ऋचाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, संजयला त्याच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यात कोणतरी भावनिकदृष्ट्या सांभाळणारी व्यक्ती हवी असते. तो माधुरीवर अवलंबून होता. मात्र माधुरीने त्याला सोडल्यानंतर तो अतिशय नैराश्य झाला. 
ऋचाच्या मृत्यूनंतर तर तिची बहीण आना शर्माने माधुरीवर गंभीर आरोप केले होते. ती एका मुलाखत म्हणाली होती की, माधुरीमध्ये माणुसकी नाही. तिला कोणताही पुरुष भेटला असता पण जो माणूस ऋचासोबत असा वागला त्याच्यासोबत ती कशी राहिली? तिने माझ्या बहिणीचा संसार मोडला असून ती घर मोडणारी आहे.