मुंबई : टेलीविजनच्या एसीपी प्रद्युमनसोबत फक्त दयाच नाही तर अभिजीत आणि पूर्ण सीआयडीची टीम मोठ्या संकटात अडकली आहे. एवढंच काय तर आता प्रेक्षक देखील या मिस्ट्रीमध्ये अडकले आहेत. अशातच 'कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है.... हा डायलॉग आता टाटा बाय बाय करणार आहे. यामुळे प्रेक्षक खूप नाराज झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर तर चक्क #SaveCID ही मोहिम सुरू झाली आहे. मात्र अद्याप या मालिकेकडून कोणतीही अधिकृत घोषणा आलेली नाही. पण मालिका बंद होणार ही बातमी ऐकताच लोकांनी हा शो आमच्या घरासारखा आहे. याला बंद करू नका अशी मागणी केली आहे. असं म्हटलं जातंय की, CID चा 27 ऑक्टोबरला शेवटचा एपिसोड आहे. प्रत्येक विकेंडला येणाऱ्या या मालिकेने आतापर्यंत 1546 एपिसोड पूर्ण केले आहेत. या शोची चर्चा आता जोरदार रंगली आहे. 


सोशल मीडियावर आता CID च्या एपिसोडची जोरदार चर्चा होत आहे. 731 वा एपिसोड सर्वांसाठीच आवडता होता. या एपिसोडमध्ये काही मुलं शाळेत खेळताना दिसत आहे. तर काही दहशतवाद्यांनी शिक्षकांना बांधून ठेवलं आहे. अशात मुलांना जेव्हा कळतं की दहशतवादी त्यांना पकडणार आहेत तेव्हा ते बाथरूममध्ये लपतात. आणि बाहेरून मदत घेण्यासाठी ते असं काही करतात की, आपण देखील बघून हैराण होऊ.. पाहा हा संपूर्ण एपिसोड 


असाच एक 26 ऑगस्ट 2017 चा एपिसोड प्रेक्षकांना आवडला होता. सीआयडीचा अभिजीत एका ट्रॅपमध्ये अडकला होता. या एपिसोडला यूट्यूबवर 58 लाखहून अधिक वेळा पाहिलं आहे. या एपिसोडमध्ये अभिजीत, दया, पूर्वी आणि पंकज एका कार्यक्रमातून येत होते. रस्त्यात त्यांना एक जखमी महिला दिसली. दया आणि अभिजीत, पूर्वी - पंकज त्या महिलेला जवळच्या रूग्णालयात घेऊन जातात. पण या सघल्यात अभिजीत कसा भसतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.