मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार आमीर खान अलीकडेच त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी आमीर खान तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याची बातमी समोर आली होती.  'लाल सिंह चड्ढा' चित्रपट आल्यानंतर आमीर खान तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत होतं. आता या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे. आमीर खानच्या एका जवळच्या व्यक्तीने यामागची सत्यता सांगितली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुपरस्टार आमीर खाननं पहिलं लग्न अभिनेत्री रीना दत्तासोबत केलं होतं. त्यानंतर आमीरने दिग्दर्शक किरण रावसोबत लग्नगाठ बांधली आणि आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी अचानक घटस्फोटाची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्यचकित केलं होतं. 


दोघांनीही निवेदन जारी करून म्हटलं होतं की, आता आम्ही आमच्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू करणार आहोत. आता आम्ही पती-पत्नी म्हणून नाही तर सह-पालक आणि एकमेकांचं कुटुंब म्हणून जगणार आहोत. आम्ही काही दिवसांपूर्वी  वेगळं होण्याचं ठरवलं होतं. आणि आता आम्ही वेगळे झालो आहोत.


किरण राव आणि आमिर खान यांच्यातील घटस्फोटाचा आरोप अभिनेत्री फातिमा शेखवर करण्यात आला होता. आता सुरुवातीचे काही दिवस अशी बातमी आली होती की, आमिर लवकरच तिसर्‍या लग्नाची घोषणा करू शकतो, ज्यावर आमीर खानच्या जवळच्या एका व्यक्तीमने अभिनेत्याच्या तिसऱ्या लग्नाची बातमी खोटी असल्याचं म्हटलं आहे.


घटस्फोटाच्या काही महिन्यांनंतर आमिर खान लवकरच लग्न करणार असल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. एवढंच नव्हेतर. लाल सिंग चड्ढा या आगामी चित्रपटाच्या रिलीजनंतर आमीर खान तिसऱ्या लग्नाची घोषणा करणार असल्याचंही बोललं जात आहे. 


हा चित्रपट पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सुपरस्टार आमीर खान हे लग्न आपल्या स्टारसोबत करणार असल्याचंही दाव्यात सांगितलं जात आहे. ज्यांनी त्याच्यासोबत यापूर्वी काम केलं आहे. मात्र, नाव कुठेही समोर आलेले नाही.