मुंबई : टीव्ही अभिनेता अभिषेक अवस्थी सध्या वाईट काळातून जात आहे. पत्नीसोबत ४ वर्षे वैवाहिक जीवन व्यतीत केल्यानंतर आता त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. होय, अभिषेक अवस्थीने अलीकडेच पत्नी अंकिता गोस्वामीपासून घटस्फोटाची घोषणा केली आहे. अभिनेत्याने ताज्या मुलाखतीत सांगितलं आहे की, तो गेल्या दीड वर्षांपासून अंकितापासून वेगळा राहत आहे आणि लवकरच घटस्फोट घेणार आहे. अभिषेकने त्याच्या आणि पत्नीमध्ये दुरावा कशामुळे निर्माण झाला याचा खुलासा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'वागले की दुनियाः नई पीढ़ी नए किस्से', 'चिंटू चिंकी और एक बड़ी सी लव स्टोरी' और 'प्रेम या पहेली चंद्रकांता' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केलेल्या अभिषेक अवस्थीने 2018 साली शेफ अंकिता गोस्वामीसोबत लग्न केलं. मात्र, लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्या नात्यात गैरसमज निर्माण झाले आणि परिणामी त्यांच्या नात्याचं रुपांतर घटस्फोटात होणार आहे. तो लवकरच घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार आहे.


अभिषेक अवस्थी यांच्या घटस्फोटामागील कारण
अभिषेक अवस्थीने संवाद साधत आपल्या पत्नीपासून वेगळं झाल्याचा खुलासा केला आहे. कामात तोटा झाला तर त्याचा वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होत असल्याचं त्यांने सांगितलं. अभिनेत्याने सांगितलं की, त्याचा दुबईमध्ये डान्स स्टुडिओ होता. जो अचानक बंद झाला. त्यामुळे त्यांचं मोठे नुकसान झालं आणि त्यांच्या आयुष्यात एक नवं वळण आलं. तो आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला होता आणि त्याचा परिणाम त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर होत होता. तोही आतून तुटला होता आणि अजिबात आनंदी नव्हता.



पत्नीशी वाद झाला
अभिषेक अवस्थी याने सांगितलं की, पत्नीसोबत छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण व्हायचं.  जेव्हा अडचणी येतात, तेव्हा तुम्ही वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देता. प्रत्येक जोडप्याला काही ना काही अडचणी येतात. पण तुम्ही ते कसे हाताळता ते तुमच्या जोडीदारावर अवलंबून असतं. माझा विवाह गैरसमजाचा बळी ठरला होता. अंकिता खूप चांगली जोडीदार होती. पण महामारीच्या काळात मला समजलं की आम्ही सुसंगत नाही आणि सर्व काही विस्कळीत होऊ लागलं. मी माझ्या पत्नीपासून विभक्त होईन असं मला कधीच वाटलं नव्हतं.