मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित जोडी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाला आज १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ऐश्वर्या आणि ज्युनियर बच्चन अभिषेकच्या लग्नाचा समावेश बॉलीवूडमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या लग्नांमध्ये होतो. 20 एप्रिल 2007 रोजी, ऐश्वर्या आणि अभिषेकने अमिताभ बच्चन यांच्या जलसा या बंगल्यात सप्तपदी घेतल्या. या जोडीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. आम्ही तुम्हाला अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्याशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिषेक बच्चन पहिल्यांदा स्वित्झर्लंडमध्ये ऐश्वर्याला भेटला होता. ऐश्वर्या येथे तिच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. तर अभिषेक एका चित्रपटासाठी लोकेशन पाहण्यासाठी गेला होता. हा तो काळ होता जेव्हा अभिषेक अभिनयाऐवजी प्रॉडक्शनचं काम पाहायचा. येथे बॉबी देओलने ऐश्वर्या रायची अभिषेकशी ओळख करून दिली.


अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी 2000 मध्ये आलेल्या ढाई अक्षर प्रेम के या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. या चित्रपटातून दोघांची जोडी पहिल्यांदा प्रेक्षकांच्या नजरेस आली. त्यावेळी दोघांमध्ये कोणतंही नातं नसलं तरी या जोडीने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं होतं.


2006 हे वर्ष ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनसाठी सगळ्यात महत्त्वाचं वर्ष होतं. या वर्षी या दोन स्टार्सनी गुरू, उमराव जान आणि धूम 2 मध्ये एकत्र काम केलं होतं, त्यामुळे दोघांना खूप वेळ एकत्र घालवण्याची संधी मिळाली. असं मानलं जातं की धूम 2 च्या शूटिंग दरम्यान दोघं एकमेकांच्या जवळ आले आणि याच दरम्यान ते एकमेकांना डेट करू लागले.



अभिषेकने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, गुरु या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघंही एकाच हॉटेलमध्ये थांबले होते. यादरम्यान अभिषेकने मिस वर्ल्ड ऐश्वर्याला प्रपोज केलं तेव्हा ऐशनेही लगेच त्याला होकार दिला. त्यावेळी अभिषेकने ऐश्वर्या रायला जी अंगठी घातली होती ती हिरा नसून नकली असल्याचं सांगितलं जाते. जानेवारी 2007 मध्ये दोघांनी जलसामध्ये एंगेजमेंन्ट केली आणि याच वर्षी एप्रिलमध्ये दोघांनी लग्न केलं


लग्नानंतर हे जोडपं एक महिन्यांसाठी हनिमूनला युरोपला गेलं होतं. आजही या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्याला आराध्या नावाची मुलगी आहे.