Ananya Pandey : बॉलीवू़ड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay deverkonda) यांचा लायगर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे. हा चित्रपट चाहत्यांमध्ये अत्यंत निराशाजनक चित्रपट ठरला आहे. त्याचबरोबर समीक्षकांकडूनही या चित्रपटाला नेगेटिव्ह रिव्ह्यूज मिळाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु या चित्रपटावरून आता ट्रोलर्समध्ये वेगळीच क्रेझ निर्माण झाली आहे. या चित्रपटातील संवादांची आता अक्षरक्षः खिल्ली उडवली जाते आहे. या चित्रपटातील अशाच एका संवादावर ट्रोलर्स जोरात बरसले आहेत. त्यातून हा संवाद अनन्या पांडेच्या तोंडी असल्याने ट्रोलर्स तिची सोशल मीडियावर खिल्ली उडवायला सुरूवात केली आहे. 


लायगर या चित्रपटाच्या एका सीनमध्ये ती असं म्हणते की ती आपलं अभिनयातलं करिअर घडवण्यासाठी हॉलीवूडला जाणार आहे. या सीनवरून ट्रोलर्सनी ट्विटरवर भन्नाट कमेंट्स दिल्या आहेत. एकाने म्हणलं आहे की तूला इथेच नीट अभिनय येत नाही तू हॉलीवू़डला काय जाणार. तर दुसऱ्याने तिची खिल्ली उडवत लिहिलंय की अनन्याला हॉलीवूडला गेली तर तिकडच्या अभिनेत्रींना तर फारच मोठी स्पर्धा मिळेल. 


काहींनी तर असेही म्हटले आहे की तिनं तर फक्त 3 कोटी रूपये घेतले आहेत विजयनं तर 35 कोटी रूपये घेतले आहेत. यात काही शंकाच नाही की तिनं लायगरमध्ये किती वाईट अभिनय केला आहे ते. 



या सगळ्या ट्रोलर्समुळे अनन्या उदास असल्याची माहिती समोर येते आहे. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की मला हॉलीवूडला जायला नक्कीच आवडेल. कारण आता सगळीकडे खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे मलाही प्रत्येक नवीन अनुभव घ्यायला आवडेल, असे वक्तव्य तिने केले होते.