मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया यांचा वीरे दी वेडिंग सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची आतापर्यंत चार गाणी प्रदर्शित झाली आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा सिनेमाचे नवे गाणे 'आ जाओ न' समोर आले आहे. या गाण्यात सर्व अभिनेत्री भावूक झालेल्या दिसतात. आयुष्यात आलेला एकटेपणा दूर करण्यासाठी फ्रेंड्स आयुष्यात कसे रंग भरतात, हे यात दाखवले आहे.
वीरे दी वेडींगमधील हे गाणे अरिजीत सिंग आणि सास्वत सचदेवा यांनी गायले आहे. तर गाण्याचे बोल राज शेखर यांनी लिहिले आहेत. गाण्याची सुरुवात करिनाच्या कालिंदी भूमिकेपासून होते. ती स्वतः ठरलेले लग्न मोडते आणि त्यानंतर खूप उदास होते. मात्र या कठीण प्रसंगात तिचे फ्रेंड्स तिची चांगली साथ देतात. पहा गाणे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


हा सिनेमा १ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची निर्मिती रिया कपूर आणि एकता कपूरने केली आहे.