Ram Gopal Varma On Aishwarya Rai Pregnancy: ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. याचं कारण तिच्यात आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या नात्यात सर्व काही आलबेल नसल्याचे दावे केले जात आहेत. तसंच दोघं लवकरच एकमेकांपासून वेगळे होणार असल्याचंही बोललं जात आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक एकमेकांपासून अंतर ठेवून आहेत. एकीकडे ऐश्वर्या राय कार्यक्रमांमध्ये आपल्या मुलीसह दिसत असून, अभिषेक कुटुंबासह हजेरी लावताना दिसत आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नाला 17 वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यांना एक मुलगी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा ऐश्वर्या आणि अभिषेक आपल्या पहिल्या मुलीचं स्वागत करणार होते तेव्हा रामगोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी सर्वांच्या भुवया उंचावणारं विधान केलं होतं.  


सुंदर महिला गरोदर होण्याची मला चिड - रामगोपाल वर्मा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. अनेक मुद्द्यांवर ते जाहीर आणि स्पष्टपणे आपलं मत मांडतात. पण आपल्या या बेधडक आणि स्पष्टवक्तेपणामुळे ते अनेकदा अडचणीत येतात. असंच एकदा रामगोपाल वर्मा यांनी ऐश्वर्या रायबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. ऐश्वर्या राय जेव्हा गरोदर होती तेव्हा रामगोपाल वर्मा यांनी हे वक्तव्य केलं होतं. ऐश्वर्या रायने जेव्हा आपण गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं, तेव्हा रामगोपाल वर्मा यांनी आपल्याला सुंदर महिला गरोदर झाल्याचं अजिबात आवडत नाही असं म्हटलं होतं. 


मी सुंदर महिलांची पूजा करतो - रामगोपाल वर्मा


रामगोपाल वर्मा यांनी अभिषेक बच्चन पिता झाल्यानंतर त्याचं अभिनंदन करणारी पोस्ट शेअर करताना लिहिलं होतं की, "जेव्हा सुंदर महिला गर्भवती होतात तेव्हा मला अजिबात आवडत नाही. पण ऐश्वर्या राय तुझी पत्नी आहे त्यामुळे मी याला अपवाद समजेन. मी सुंदर महिलांची पूजा करतो आणि त्या आई झाल्याची मला चिड आहे. ऐश्वर्या जास्त सुंदर आहे त्यामुळे मी जास्त तिरस्कार करतो". रामगोपाल वर्मा यांनी आपण त्या दांपत्यासाठी आनंदी आहोत, जे आपल्या पहिल्या मुलाची अपेक्षा करत आहेत असंही म्हटलं होतं. 


ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये सर्व काही ठीक नाही?


गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दोघेही घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याचे दावे केले जात आहेत. याचं कारण अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात बच्चन कुटुंब वेगवेगळं पोहोचलं होतं. ऐश्वर्या राय आपली मुलगी आराध्यसह दिसली होती. काही रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्याचं सासरच्यांशी पटत नसल्याने  तिने त्यांच्यापासून अंतर ठेवलं आहे. पण दोघांनी अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.