मुंबई : बच्चन कुटुंब हे बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक आहे आणि हे कुटुंब नेहमीच चर्चेत असतं. ऐश्वर्या राय बच्चन 2007मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केल्यावर या कुटुंबाचा भाग बनली. दोघांच्या लग्नाला 14 वर्षे झाली आहेत. आणि दोघेही आपलं आयुष्य आनंदाने जगत आहेत. दोघांना आराध्या बच्चन नावाची 9 वर्षांची मुलगी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्या ज्या प्रकारे लग्नानंतर कुटुंबात स्थायिक झाली, त्याची स्तुती जया बच्चन यांनी एका मुलाखतीत तिचं खूप कौतुक करत केली आहे. सून ऐश्वर्याची स्तुती करताना जया म्हणाल्या, "ती खूप गोड आहे, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. तुम्हाला माहिती आहे, मला ती आधीपासूनच आवडायची, हे छान आहे की, ती खूप मोठी स्टार आहे. पण जेव्हा आम्ही एकत्र असतो, तेव्ही मी कधीच तिचा एटीट्यूड नाही पाहिला. मला आवडतं की ती मागे उभी असते. ती शांत आहे, ती ऐकते, दुसरी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती कुटुंबात खूप व्यवस्थित फिट होते. ती खूप सशक्त आणि मजबूत स्त्री आहे. तिच्यामध्ये प्रतिभा आहे.


याआधी एका मुलाखतीत अभिषेक बच्चनने ऐश्वर्याचे कौतुक केलं होतं आणि म्हटलं होतं की, तिच्याशी लग्न केल्यानंतर आयुष्यात अनेक बदल झाले. अभिषेक म्हणाला की, ऐश्वर्याशी लग्न करण्यापूर्वी त्याला आत्मविश्वास नव्हता, पण ऐश्वर्याने पुन्हा त्याच्यामध्ये आत्मविश्वास जागवला. लग्नानंतर, त्याच्यामध्ये जबाबदारीची भावना आली आणि त्याला वाटलं की, आता त्याला ऐश्वर्यासाठी जगावं लागेल, तिची काळजी घ्यावी लागेल तिचं संरक्षण करावं लागेल. ऐश्वर्या सध्या आगामी चित्रपट मणिरत्नमच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर अभिषेकने नुकतंच दस्त चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे.