मुंबई : ऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न हे बॉलिवूडमधील अतिशय खास लग्न होतं. या लग्नाची वेगवेगळ्या कारणामुळे चर्चा झाली. या लग्नातील ऐश्वर्याचं मंगळसूत्र हे देखील चर्चेचा विषय होता. अभिषेकने ऐश्वर्याला अतिशय महागडं असं मंगळसूत्र लग्नात घातलं होतं. (Why Aishwarya Rai Bachchan changed her 45 Lakhs Mangalsutra after 4 years of Marriage ) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्याचं लग्नातील मंगळसूत्र हे खूप चर्चेत आलं. मंगळसूत्राला हिऱ्यांनी जडलेलं असं पेंडेंट होतं. हिऱ्यांनी जडलेल्या या मंगळसुत्रांची किंमत तब्बल 45 लाख इतकं होतं. मात्र एवढं महागडं मंगळसुत्र ऐश्वर्याने फक्त चारच वर्षं घातलं. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाला 14 वर्षे झाली आहेत. बॉलिवूडमधील हे अतिशय चर्चेतील आणि साधं असं कपल आहे. याजही या दोघांचं प्रेम कायम टिकून आहे. 



अमिताभ बच्चन यांनी मुलगा अभिषेक बच्चनच्या लग्नात कोणतीच कमी केली नाही. यावेळी अभिषेकने ऐश्वर्याला घातलेलं 45 लाखांचं हिरेजडीत मंगळसूत्र घातलं. हे मंगळसूत्र अतिशय सुंदर आहे. या मंगळसुत्राची त्यावेळी अतिशय चर्चा झाली.


मात्र ऐश्वर्याने एवढं महागडं मंगळसुत्र अगदी 4 वर्षातंच बदललं. एवढं महागडं मंगळसुत्र अभिषेकने घालूनही ऐश्वर्याने का काढून टाकलं? याचं कारण आता समोर आलं आहे. हे कारण वाचून काहींना ऐश्वर्याची किव येईल तर काहींना तिच्या निर्णयाचं कौतुक वाटेल. 



अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचं लग्न हे बॉलिवूडमधील अतिशय खास लग्नांपैकी एक आहे. त्यांच्या लग्नात देश-परदेशातून अनेक मंडळी उपस्थित होते. अभिषेक-ऐश्वर्याचं हे लग्न मंगलोरियन स्टाईलमध्ये झालं.


लग्नाच्या दिवशी ऐश्वर्याने गोल्डन रंगाची कांजीवरम साडी घातली होती. तिचा हा लूक चाहत्यांच्या अतिशय पसंतीत आलं होतं. या साडीत ऐश्वर्या कोणत्या अप्सरेपेक्षा कमी सुंदर दिसत नव्हती. 



लग्नात चर्चेत आलेल्या मंगळसुत्राची खूप चर्चा झाली. मात्र कालांतराने म्हणजे चार वर्षांनी 45 लाखांच्या हिरेजडीत मंगळसुत्रात बदल झाल्याचं आढळलं. लग्नात ऐश्वर्याने हिरे जडीत अशा दोन लेयरचं मंगळसूत्र घातलं होतं. हे मंगळसूत्र अनेकदा तिच्या गळ्यात पाहिलं होतं. 



मात्र काही वर्षांनंतर ऐश्वर्याचं हे मंगळसूत्र लहान झाल्याचं दिरसलं. 2011 मध्ये आराध्याचा जन्म झाला. आराध्याचा जन्म झाल्यानंतर ऐश्वर्याने आपल्या लाईफ स्टाईलमध्ये एक महत्वाचा निर्णय घेतला. 


ज्या ज्वेलरीची चर्चा झाली ती ज्वेलरी म्हणजे ऐश्वर्याचा खास दागिना. ऐश्वर्याने आपल्या मंगळसूत्रात बदल केले. कारण आराध्याच्या कोमल शरीराला कोणताच दागिना टोचू नये. आपल्या लेकीला कोणताच त्रास होऊ नये. म्हणून ऐश्वर्याने आपल्या महत्वाच्या दागिन्यात बदल केला.