सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलेने चाकू उचलला किंवा कोणता पदार्थ कापला तर अगदी त्याच पद्धतीने बाळाचा काही भाग कापला जाण्याची शक्यता असते, असा अनेकांना समज आहे. हा समज खरा आहे का? यामागील व्हायरल सत्य काय? समजून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गर्भवती महिलांना नऊ महिने अनेक गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यांनी काय खावे, काय खाऊ नये, कोणत्या वेळी घराबाहेर पडू नये आणि नऊ महिने कोणते काम करावे, या सर्व गोष्टी वडिलधाऱ्या व्यक्तींनी आधीच ठरवून ठेवल्या आहेत. गर्भवती महिलांसाठी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण चांगले मानले जात नाही.


08 एप्रिल 2024 रोजी सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नसले तरी या काळात गर्भवती महिलांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. हे ग्रहण 08 एप्रिल रोजी रात्री 11:22 वाजता सुरू होईल आणि 09 एप्रिल रोजी सकाळी 12:41 वाजता समाप्त होईल. ग्रहण काळात, गर्भवती महिलांना चाकू किंवा कोणतीही धारदार किंवा टोकदार वस्तू वापरू नका असे सांगितले जाते. त्यामुळे खरोखर काही नुकसान होते का?


चाकूचा वापर का करु नये? 


ग्रहणकाळात चाकू न वापरण्याचा सल्ला गरोदर महिलांनी दिल्याचेही तुम्ही ऐकले असेल. यामुळे मुलाच्या काही अवयवांवर परिणाम होतो किंवा त्यात काही विकृती येऊ शकते, असे त्यांचे मत आहे. यात किती तथ्य आहे ते जाणून घ्या.


चाकूपासून राहावे लांब 


artofliving.org वर प्रकाशित झालेल्या एका लेखात असेही म्हटले आहे की, गरोदर महिलांनी ग्रहणकाळात कोणत्याही तीक्ष्ण किंवा विशिष्ट प्रकारच्या धातूच्या वस्तू न वापरल्यास चांगले होईल. यामुळे अपघात किंवा कोणतीही नकारात्मक गोष्ट घडत नाही.


ग्रहणात का वापर करु नये 


 प्राचीन काळी वीज नव्हती आणि आधीच्या काळात ग्रहणाच्या वेळी अधिकच अंधार पडत असे आणि त्यांना विशेषत: ग्रहण काळात महिलांना सुरक्षित ठेवायचे होते, म्हणून त्यांनी ग्रहणकाळात महिलांना स्वयंपाकासारखी दैनंदिन कामे करण्याची परवानगी दिली. कापणे, पिठ मळणे यासारख्या गोष्टी करण्यास मनाई होती. पण मग अशावेळी गर्भवती महिलांनी ग्रहण काळात काय करावे हा प्रश्न पडतो?


सूर्यग्रहणात काय करावे?


ग्रहण काळात महिलांनी ध्यान करावे. तुम्ही डोळे बंद करून श्वासोच्छ्वासावर लक्ष देखील केंद्रीत करू शकता. शक्य असल्यास 'ॐ नमः शिवाय' चा जप करा किंवा गायत्री मंत्राचा पाठ करा. जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही हलके काही खाऊ शकता. ग्रहणाच्या वेळी बाहेर पडणारे किरण सर्व काही शोषून घेतात आणि याचा परिणाम अन्नावरही होतो. शक्य असल्यास ग्रहणानंतर अन्न शिजवावे.


ग्रहणात काय खाऊ नये 


ग्रहण काळात खाऊ नये. मात्र, आयुर्वेदात, गर्भवती महिला, लहान मुले, आजारी आणि वृद्ध व्यक्तींना ते खाण्यास मनाई नाही. ग्रहणाच्या वेळी किंवा त्यापूर्वी खाऊ नये असा सल्ला दिला जातो कारण यावेळी खाल्लेले अन्न आपले चयापचय वाढवते जे मन शांत राहू देत नाही. हे अन्न खाल्ल्याने तुम्हाला झोप येईल जी ग्रहणाच्या वेळी योग्य नाही.