मुंबई : सुक्या मेव्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. थंडीचा ऋतूमध्ये सुक्या मेव्याचे सेवन शरीरासाठी अधिक चांगले असते. वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रायफ्रुट्समध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात. ज्याचा आपल्याला फायदा होतो. काजूच्या फायद्यांबद्दल सांगायचे झाले तर, ते केवळ शरीरासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर मानले जाते. त्यात भरपूर पोषक घटक असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यात लोह आणि जस्त भरपूर प्रमाणात असते. ऍनिमियाच्या समस्येपासून आराम मिळण्यासाठी त्याचे सेवन चांगले आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी, झिंक, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते.


इतके फायदे असूनही काजू शरीराला हानी पोहोचवू शकतात. जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त काजू खात असाल तर ते फायद्याऐवजी हानिकारक ठरू शकते. मात्र, अनेकांना याची माहिती नसल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. आम्ही तुम्हाला या तोट्यांबद्दल सांगणार आहोत.


पोटाच्या समस्या
जर तुमचे पोट कोणत्याही कारणाने खराब झाले असेल तर चुकूनही काजूचे सेवन करू नये. यामुळे पोटाची समस्या आणखी वाढू शकते. असे मानले जाते की काजू जास्त प्रमाणात खाल्ल्याने अपचन, जुलाब, गॅस आणि पोटात इतर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे रोज काजू खा, पण जास्त प्रमाणात खाऊ नका.


लठ्ठपणा
काजूमध्ये भरपूर कॅलरीज असतात आणि जर ते जास्त प्रमाणात खाल्ले तर लठ्ठपणा येऊ शकतो. ज्या लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो त्यांना काजू न खाण्याचा सल्ला दिला जातो. दिवसातून 4 ते 5 काजू खाणे उत्तम आणि असे केल्याने तुम्हीही निरोगी राहाल.


ऍलर्जी
कधी कधी काजूमुळे लोकांना ऍलर्जी होते. ऍलर्जीमुळे तुमच्या त्वचेवर खाज सुटू शकते किंवा पुरळ उठू शकते. तज्ज्ञांच्या मते, जे लोकं आधीपासूनच ऍलर्जीच्या समस्यांनी ग्रस्त आहेत, त्यांनी काजूचे सेवन टाळावे. त्यामुळे त्यांचा त्रास आणखी वाढू शकतो.


डोकेदुखी
काजूमध्ये असलेले टायरामाइन आणि फेनिलेथिलामाइन हे अमिनो अॅसिड्स डोकेदुखीसाठी कारणीभूत ठरतात. ज्या लोकांना अनेकदा डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होतो त्यांना काजू न खाण्याचा सल्ला दिला जातो.