मुंबई : पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे आजारांचा धोका ही वाढतो. त्यामुळे पावसाळा सुरु झाल्यानंतर आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्याचा धोका जास्त असतो, ज्यामुळे एखादी व्यक्ती सहजपणे संसर्गास बळी पडू शकते. त्यामुळे या काळात अशा गोष्टींचे सेवन केले पाहिजे, ज्या तुमच्या रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुम्ही कोणती फळे खावीत.


जांभूळ :


जांभूळमध्ये 1.41 मिलीग्राम लोह, 15 मिलीग्राम कॅल्शियम आणि 18 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. याव्यतिरिक्त, हे हंगामी फळ अँटिऑक्सिडंट्सचे भांडार देखील आहे, जो रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि कोलेजन तयार करण्यात मदत करते, जे आपल्याला चांगली त्वचा राखण्यास मदत करते.


सफरचंद


सफरचंदांमध्ये व्हिटॅमिन सी आणि क्वेर्सेटिन नावाच्या फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात जे कोणत्याही रोगापासून बचाव करताना रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतात. सफरचंदमध्ये शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक असतात.


डाळिंब


डाळिंबात अँटिऑक्सिडंट असतात जे आतडे-आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतात. डाळिंब तुम्हाला ग्रीन टीपेक्षा चांगले डिटॉक्स करण्यास मदत करू शकते.


केळी


केळीमध्ये व्हिटॅमिन बी 6 भरपूर असते जे रोगप्रतिकारक शक्तीचे योग्य कार्य करण्यास मदत करते.


नाशपती


भरपूर फायबर आणि पोटॅशियम व्यतिरिक्त, नाशपतीच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-इंफ्लॅमेटरी फ्लेव्होनॉइड्स भरपूर असतात.


सूचना : यामध्ये देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. औषध किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. कोणतीही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.