तिरुअनंतपुरम : तामिळनाडू आणि केरळ राज्याला ओखी चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे खरबरादारीचा उपाय म्हणून चेन्नई, मदुराईसह अनेक शहरांतल्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान ओखी चक्रीवादळानं उग्र रुप धारण केलं असून, अरबी समुद्राच्या दिशेनं ते सरकू लागलं आहे. केरळ, तामिळनाडूसह दक्षिण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळत असून केरळमध्ये किमान ७ जणांचा बळी गेल्याची माहिती आहे.


समुद्रात भरकटलेल्या २१८ मच्छिमारांची नौदलानं सुखरुप सुटका केलीये. या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांना सज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत.