उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरातील खुर्जा नगर कोतवाली क्षेत्रात एका जावयानेच आपल्या सासूची हत्या केली आहे. सासू पत्नीला सासरी पाठवत नसल्याच्या रागातून त्याने आपल्या सासूला ठार केलं. सासू मुलीला माहेरीच ठेवून घेत होती. यामुळे संतापलेल्या जावयाने सासरी पोहोचून सासूची निर्घृणपणे हत्या केली. सासू रात्री झोपलेली असताना जावयाने कुऱ्हाडीने वार करत तिचे तुकडे केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोतवाली क्षेत्रात राहणाऱ्या 55 वर्षीय मीना देवी यांची 10 ऑक्टोबरच्या रात्री हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरु केला होता. पण पोलिसांच्या हाती काहीच पुरावा लागत नव्हता. पोलिसांना घऱातीलच एखाद्या व्यक्तीने हत्या केल्याचा संशय होता. पण त्यांच्याकडे ठोस पुरावा नव्हता. 


पोलिसांनी तपास करताना परिसरातील 25 सीसीटीव्ही तपासले. यादरम्यान त्यांना घराच्या आसपास जावई बंटी हा टेहाळणी करत असल्याचं दिसलं. यानंतर त्यांनी त्याची चौकशी सुरु केली. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करत उडवाउडवीची उत्तरं दिली. पण पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. 


जावयाची कबुली


आरोपी जावयाने पोलिसांना सांगितलं की, सासू बायकोला सासरी जावून देत नव्हती. यामुळे आमच्या घरात भांडणं होत होती. ती नेहमी वेगवेगळी कारणं सांगत तिला पाठवणं टाळत असे. यामुळे आपण फार त्रस्त झालो होतो. यामुळेच आपण 10 ऑक्टोबरच्या रात्री सासू मिनाची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. 


पोलिसांनी सांगितलं आहे की, वरुण कुमार याची चौकशी केली असता त्याने सासू मुलीला सासरी जाऊ देत नव्हती असं सांगितलं. आपल्या घरात यामुळेच भांडणं होत असल्याचं त्याला वाटत होतं. यामुळेच त्याने आपल्या सासूची हत्या केली.