नवी दिल्ली : सत्ता गेल्यानंतरही अखिलेश यादव आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्त्यांची सत्तेची धुंदी उतरलेली दिसत नाही. याचंच एक उदाहरण उत्तरप्रदेशच्या एका टोल नाक्यावर पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखिलेश यादव यांनी टोल नाक्यावर पैसे न भरताच आपल्या ताफ्यातील १७५ कार घेऊन निघून गेले. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.


अखिलेश कुमार यांनी बुधवारी अयोध्येपासून भाजपविरुद्ध 'देश बचाओ - देश बनाओ' अभियान सुरू केलंय. याचनिमित्तानं ते आपल्या कार्यकर्त्यांसमवेत अयोध्येला जात होते. त्यांचा हा ताफा बाराबंकीला पोहचला तेव्हा त्यांनी १७५ गाड्या टोलचे पैसे दिल्याशिवाय निघून गेला.