नवी दिल्ली : राज्यसभा सदस्यत्वानंतरच्या आपल्या पहिल्याच भाषणात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यसभेत, काँग्रेसवर हल्लाबोल केला. 


अमित शाह यांनी सोबतच सुमारे पाऊणे चार वर्षांतल्या मोदी सरकारच्या कामांचाही उल्लेख केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान ते बोलत होते. गरीबी हटवण्यासाठी भाजप सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.