इंदूर: राहुल गांधी यांना कोणताही दौरा म्हणजे सहलीचे ठिकाण वाटते, अशी खोचक टीका केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केली. त्या बुधवारी इंदूर येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर टीका केली. राहुल गांधी कुठेही दौऱ्यासाठी गेले म्हणजे छायचित्र काढायची संधी मिळते. परदेश दौरे त्यांच्यासाठी जणू सहलीचे ठिकाण असते. इतकी अपरिपक्व वागणूक असणाऱ्यांना देश चालवता येत नाही, असे उमा भारती यांनी म्हटले.


तसेच मध्य प्रदेशातील काँग्रेस नेत्यांचीही त्यांनी यावेळी खिल्ली उडवली. काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये जाऊन शिकावे, असा टोला त्यांनी हाणला.