नवी दिल्ली : बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput)निधनानंतर तीन प्रमुख एजेन्सी सीबीआय, ईडी आणि एनसीबी या प्रकरणात तपास करत आहे. यादरम्यान भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी, सुशांतची हत्या झाली असून यामागे मोठं षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी, सुशांत आत्महत्या प्रकरणात अंतिम निर्णय कधी येईल, असा सवाल सुशांतचे चाहते विचारत असल्याचं ट्विट केलं आहे. पार्थिव शरीर नसल्याने एम्सची टीम यावर स्वतंत्र्य चौकशी करु शकत नाही. त्यामुळे आता रुग्णालयातून देण्यात आलेल्या नोंदींवरच अवलंबून राहावं लागणार. हत्येची बाब नाकारली जाऊ शकत नाही. परंतु सीबीआय परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आपला निर्णय घेऊ शकते.



'सीबीआय, एनसीबी आणि ईडी या त्रिमूर्ती एजन्सींनी मोठ्या पुराव्यांचा खुलासा केला आहे. मला विश्वास आहे की, या पुराव्यांआधारे ही कट रचून झालेली हत्या असल्याचं, सीबीआयला कोर्टात सिद्ध करणं सोपं होईल' असंही ट्विट करत सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याचं म्हटलं आहे.



दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी असलेल्या रिया चक्रवर्तीचा (Rhea chakraborty) जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. रियासह तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत, जैद आणि बासित अशा सहा जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.


सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज आणून देण्यामध्ये आपली भूमिका असल्याची कबुली रियाने एनसीबीला दिली होती. तसंच ड्रग्जबाबतचं चॅटही आपलंच असल्याची माहितीही रियाने दिली होती.