Man killed in Fight Over Rasgulla: लग्नसमारंभांमध्ये एखाद्या गोष्टीवरुन वाद सुरु झाल्यानंतर तो अगदी हणामारीपर्यंत गेल्याच्या अनेक घटना आपण बातम्यांमध्ये पाहत असतो, वाचत असतो. अनेकदा छोट्या मोठ्या गोष्टींवरुन सुरु झालेल्या वादातून वर आणि वधू पक्षातील नातेवाईक अगदी एकमेकांशी हाणामारी करतात आणि त्यातून काहीतरी भयानक घडतं. असाच प्रकार नुकताच उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) घडला. येथील मैनपुरीमध्ये (Mainpuri) लग्नसमारंभामध्ये एका रसगुल्ल्यावरुन (Rasgulla) सुरु झालेल्या वादातून एका व्यक्तीला प्राण गमवावा लागला. या व्यक्तीला एवढी हणामारी करण्यात आली की त्यात तिची जीव गेला.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मैनपुरीमधील कुरावली पोलीस स्टेशनच्या क्षेत्रात येणाऱ्या बीकापुर गावामध्ये हा लग्नसोहळा आयोजित करण्यात आलेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बीकापुरमध्ये रणबीर सिंह मेव्हण्याबरोबर साडूच्या मुलीच्या लग्नासाठी आले होते. यावेळी रणबीर यांनी गावातील काही मुलं रसगुल्ले खाऊन लग्नसमारंभातून बाहेर जात असल्याचं पाहिलं. रणबीर आणि त्यांच्याबरोबरच्या रामकिशोर नावाच्या व्यक्तीने या गावातील तरुणांना रोखलं. त्यांनी रसगुल्ले खाल्ल्याचं आपण पाहिलं आहे असं या तरुणांना सांगितलं. यावरुन रणबीर आणि रामकिशोर यांना या मुलांनी बेदम मारहाण केली. यात रणबीरचा जागीच मृत्यू झाला.


तिघांना अटक एक फरार


गंभीर जखमी झालेल्या रामकिशोरला सैफई येथील पीजीआय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. या दोघांना बेदम मारहाण करणाऱ्यांची ओळख पटली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. चौघांनी रणबीर आणि रामकिशोर यांना मारहाण केली. यापैकी रजत आणि अजय नावाच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. अन्य एकाचं नाव पोलिसांनी सांगितलेलं नाही. तर या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. या तिघांविरोधात हत्या आणि अन्य गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.