नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून ट्रिपल तलाकच्या कायद्याचा मसुदा राज्यांकडे सुपूर्द करण्यात आलाय. कायदा अस्तित्वात आल्यास तलाख देणाऱ्यावर अजामीनपात्र गुन्हा दखल होणार आहे. 


कायद्याचा मसुदा तयार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारनं ट्रिपल तलाकच्या कायद्याचा मसुदा तयार केलाय. या मसुद्याला राज्यांमध्ये पठवण्यात आलंय.  हा कायदा अस्तित्वात आल्यास ट्रिपल तलाक देणाऱ्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 


दोषीला तीन वर्षांची शिक्षा आणि दंडही


तसेच दोषीला तीन वर्षांची शिक्षा आणि दंडही ठोठावला जाऊ शकतो. या मसुद्याचं नाव मुस्लिम वुमन प्रोडेक्शन ऑफ राइट्स लॉ असं आहे.. यात पीडितेला भरपाई देण्याचंही प्रस्तावित आहे. मोदी सरकार हिवाली अधिवेशनात हा मसुदा सभागृहात ठेवणार आहे.


हा कायदा जम्मू-काश्मीरला लागू नाही


या मसुद्याचं कायद्यात रुपांतर झाल्यास मुस्लीम महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र हा कायदा मंजूर झाल्यास जम्मू-काश्मीर या राज्यांसाठी तो लागू होणार नाही.