नवी दिल्ली :  देशात कोरोना संसर्ग नियंत्रणाबाहेर जातो की काय अशी भयावह परिस्थिती निर्माण होत आहे. आरोग्य मंत्रालयालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात देशात 1501 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर,  2 लाख 61 हजार 500 नवीन रुग्ण समोर आले आहेत.  दरम्यान, 1 लाख 38 हजार 423 रुग्ण बरे झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
 देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेचा सर्वात जास्त तडाखा महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात काही दिवसांपासून 60 हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. 
 
 केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज माहिती दिली की, केंद्राकडून महाराष्ट्राला 1121, उत्तर प्रदेश 1700, झारखंड 1500, गुजरात 1600, मध्य प्रदेश 151 व्हेंटिलेटर देण्यात येत आहेत.


महाराष्ट्रात रुग्णांचा आलेख वाढताच


राज्यात 24 तासांत 67 हजार 123 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आसून 419 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 56 हजार 783 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले आहेत.  रूग्णांची वाढती संख्या पाहाता केंद्र आणि राज्य सरकार अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत.