नवी दिल्ली : निवडणुकांची धुमश्चक्री आता लांब नाही हे आता स्पष्ट व्हायला सुरूवात झाली आहे. देशातील दोन्ही प्रमुख पक्ष भाजप आणि काँग्रेस आता एकमेकांवर तुटून पडलेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा पैसा चोरल्याचा आरोप केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राफेल विमान खरेदीत पंतप्रधान मोदीनी तीस हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात घातल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. तर गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसकडून होणाऱ्या टीकेला पंतप्रधान मोदींनीही जोरदार उत्तर दिलंय. जितका चिखल उडवाल तितकं कमळ फुलेल असं पंतप्रधान मोदींनी म्हंटलंय. 


मध्यप्रदेश निवडणुकीआधी मोदींच्या उपस्थितीत कार्यकर्ता महाकुंभाचं आयोजन करण्यात आलं. त्यावेळी निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकताना मोदींनी देशातल्या प्रत्येक बुथवर कमळ फुलवण्याचा निर्धार व्यक्त केला.