श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील हंदवाडाच्या जंगलामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. सुरक्षारक्षकांनी दहशतवाद्यांना घेरलं आहे. जवळपास ३ ते ४ दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी मध्यरात्री देखील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. गेल्या अनेक दिवसांपासून सीमाभागातून दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. दहशतवाद्यांचा हा प्रयत्न भारतीय जवान हाणून  पाडत आहेत. आतापर्यंत अनेक दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले आहे.


जम्मू-काश्मीरमध्ये चकमक सुरु असतांना अनेकदा स्थानिकांकडून जवानांवर दगडफेक केली जाते. भारतीय जवानांनी अशा परिस्थितीतही अनेक दहशतवाद्यांना ठार केलं आहे.