पुँछ : पाकिस्तानने पुन्हा एकदा सीमेपलीकडून गोळीबार केला आहे. सीमेवरील भारतीय चौक्यांना पाकिस्तानने लक्ष्य केलं आहे. या गोळीबारात ५ भारतीय नागरिक जखमी झाले आहेत, तर एका भारतीय मुलाचा मृत्यू झाला आहे. 


स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने सकाळी सकाळीच फायरिंग केलं, यामुळे जंगलातही काही ठिकाणी आग दिसत होती, फायरिंगमुळे रस्त्यावरील वाहतुकही बंद झाली. पाकिस्तानने नागरिकांनाही लक्ष्य केलं असू शकतं, असं स्थानिकांनी सांगितलं आहे.