हमीरपूर : भारत हा महिलांसाठी खतरनाक देश असल्याचे काही दिवसांपूर्वी  आलेल्या एका अहवालातून समोर आले. सरकारने हा अहवाल नाकारला असला तरी आजही महिला सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. उत्तर प्रदेशमधील हमीरपुरमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर येत आहे, जी महिला सुरक्षित असल्याचे म्हणणाऱ्यांची पोलखोल करतेय.  मानवतेला काळीमा फासणारी घटना हमीरपूरमध्ये घडली आहे.  एका मागासवर्गीस महिलेसोबत सामूहिक बलात्कार करण्यात आलाय. या पिडितेने आपल्या घरातल्यांकडे यासंदर्भात तक्रार केली तेव्हा यांच्यातील राक्षसी वृत्ती आणखी बळावली. नराधमांनी तिला मारहाण तर केलीच पण तिच्या गुप्तांगात लाकूड टाकत कपडे उतरवून तिची गावभर धिंड काढली.


जीवे मारण्याची धमकी 


 '२९ जूनला घरात घुसून माझ्यावर आमानुष अत्याचार करून राक्षसी कृत्य केल्याची' तक्रार पिडित महिलेने केली आहे.  तिच्या परिवारानेही १ जूलैला यासंबधी पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याविरूद्ध तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे. आरोपींनी पिडित महिलेच्या भाच्याला धमकावले जो एका स्थानिक मुलीवर करत असल्याचे म्हटले जाते.  आपल्या भाच्याला धमकावल्याचा त्या महिलेने विरोध केला होता.  त्यानंतर आरोपींनी तिच्यावर गॅंगरेप केला आणि तिला जिवे मारण्याची धमकीही दिली.