बंगळुरू : कर्नाटकमधील धडाडीच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने लेखक विक्रम संपत यांची चौकशी केली. संपत हे त्यांच्या अगामी पुस्तकाच्या संशोधनासाठी लंडनमध्ये होते. लंडनवरून परतताच विशेष तपास पथकाने संपत यांचा जबाब शुक्रवारी नोंदवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील काही दिवसात गौरी लंकेश यांनी संपत यांच्या विरोधात लिखाण केले होते. हा धागा पकडून पथकाने त्यांची चौकशी केली असावी असा कयास आहे. दरम्यान, विशेष पथकाने केलेल्या चौकशीबद्दल विक्रम संपत यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे. संपत यांनी आपल्य ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'एसआयटीचा माझी चौकशी करण्यामागचा हेतू मला कळलेला नाही. पण कायद्याचे पालन करणे हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य असल्याने मी एसआयटीला सर्वतोपरी सहकार्य केले.'


दरम्यान, गौरी लंकेश हत्याप्रकरणाची केली जाणारी चौकशी ही दिशाहीन असल्याचेही संपत यांनी अप्रत्यक्षपणे म्हटले आहे. गौरी लंकेश बंगळुरू मिररमध्ये एक सदर लिहीत. या सदरात २०१५ मध्ये त्यांनी साहित्यिकाच्या पुरस्कार वापसीबद्दल सडेतोडपणे लिहीले होते. या सडेतोड लिखाणाचे पडसाद बंगळुरू साहित्य परिषदेत बराच काळ उमटत राहिले. या सदरात लंकेश यांनी संपत यांच्याबाबतही टीकात्मक लिखान केले होते. लिखान करण्यापू्र्वी गौरी लंकेश काय अभ्यास करत असत. तसेच, कोणत्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी लिखान केले याबाबतही एसआयटीने तपास सुरू केला आहे.