मोतिहारी : लग्नात अनेक गोष्टी कधी कधी अशा घडतात ज्या अपेक्षित नसतात. अशीच एक घटना समोर आली आहे ज्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. बिहारमधील मोतिहारी येथील ही धक्कादायक घटना आहे. नववधूने असं काही केलं की सगळेच थक्क झाले. नववधूने हनिमूनच्या वेळी वराची अशी फसवणूक केली जी तो आयुष्यभर कधीच विसरु शकत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हनिमूनसाठी वधूची तो वाट पाहत होता पण नववधू लाखोंची रोकड आणि दागिने घेऊन पसार झाली. याची साधी कुणकुणही कुणाला लागली नाही. पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे की, नववधू आपल्या भावासोबत 4 लाखांचे दागिने, 1.50 लाख रुपये रोख घेऊन दुचाकीवरून पळून गेली.


आनंद कुमार याचा विवाह मुन्नी कुमारी हिच्याशी 9 मे रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार पार पडला. या संदर्भात आनंद कुमार यांनी पकडीदयाळ पोलीस ठाण्यात अर्ज देऊन सांगितले की, रात्री 11 वाजता वधूचा भाऊ कृष्णा साह सोबत दोन मित्र त्याच्या घरी आले होते.


रात्री उशिरा वधूचा भाऊ दुसऱ्या खोलीत झोपायला गेला. रात्री संधी पाहून नववधू मुन्नी कुमारी भाऊ कृष्णा साहसह दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाले.


पीडित वराने पोलिसांना सांगितले की, रात्री उशिरा मोटारसायकलचा आवाज ऐकून तो उठला आणि त्याने पाहिले की वधू आणि तिचा भाऊ घरी नाहीत आणि मौल्यवान वस्तूही गायब आहेत. हुंड्यात दिलेली नवीन दुचाकीही तिथे नव्हती. पीडित आनंद कुमार म्हणतो की, या घटनेनंतर त्याला घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे, त्याला न्याय हवा आहे.