मुंबई : भारत अंतराळात पुन्हा एकदा आपला झेंडा रोवण्याच्या प्रयत्नात आहे. मंगळवारी इस्रोने घोषणा केली आहे की, भारताचं पुढचं मिशन चंद्रयान-2 मिशन आता 3 जानेवारी, 2019 ला लॉन्च होणार आहे. लॉन्च झाल्यानंतर 40 दिवसात यान चंद्रावर पोहोचेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्रोचे चेअरमन के. सिवान यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत माहिती दिली की, मार्च 2019 च्या आधी भारत 19 मिशन लॉन्च करणार आहे. यामध्ये चंद्रयान-2 चा देखील समावेश आहे. चंद्रयान-2 याच वर्षी अतंराळात जाणार होतं पण डिझाईनमध्ये काही बदल होणार असल्याने हे मिशन पुढे ढकलण्यात आलं.


नव्या डिझाईनमुळे यानाचं जवळपास 600 किलो वजन वाढलं आहे. यान तयार झाल्यानंतर जेव्हा त्याची चाचणी केली गेली तेव्हा असं लक्षात आलं की, उपग्रह जेव्हा चंद्रावर उतरेल तेव्हा त्याचा काही भाग हा चंद्रावर उतरेल तेव्हा तो हलू लागेल. त्यामुळे या उपग्रहाचं वजन पुन्हा वाढवण्याची आवश्यकता भासली.
 
हे मिशन लॉन्च झाल्यानंतर भारत चंद्रावर पोहोचणारा चौथा देश बनणार आहे. याआधी अमेरिका, रूस आणि चीनने चंद्रावर आपले यान पाठवले आहेत.