श्रीनगर : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले असून त्यांची ओळख अजून पटलेली नाही. श्रीनगरच्या खोनमोहमध्ये दहशतवादी घुसले होते. यावेळी एका इमारतीत लपलेल्या भारतीय जवानांनी या दहशतवाद्यांना घेरलं. यानंतर दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तर तीन भारतीय जवान जखमी झाले आहेत.