नवी दिल्ली : उत्तर काश्मीरमधील बांदीपुरा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत हवाई दलाचा एका कमांडो शहीद झाला आहे.


पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांदीपुरा जिल्ह्यात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली. त्यानंतर भारतीय सैन्याने हाजिन परिसरातील चंदरगीर गावाला घेरलं.


यावेळी लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. 



या चकमकीत हवाई दलाचा एका कमांडो शहीद झाला आहे तर एक जवान जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.