नवी दिल्ली : काँग्रेसच्या 'हाता'त या देशाला पुन्हा जोडण्याची शक्ती आहे, असे विधान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. दिल्लीत आयोजित कॉंग्रेसच्या महाअधिवेशनात ते बोलत होते. कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर राहुल यांचे हे पहिले अधिवेशन आहे.


प्रेमाचे राजकारण करायचे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 यावेळी राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.


ते द्वेषाचे राजकारण करतायत आपल्याला प्रेमाचे राजकारण करायचे आहे. 



तरुणांना प्रोत्साहन देणं चांगली गोष्ट आहे पण वरिष्ठांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही.


ज्येष्ठांचे मार्गदर्शन  


 पार्टी पुढे जाण्यामध्ये तरुणांचा निश्चित सहभाग असेल पण त्यांना मार्ग दाखविण्याचे काम ज्येष्ठ नेते करतात.


ज्येष्ठ नेत्यांकडे आयुष्यातला अनुभव आहे, तरुणांनी हे मार्गदर्शन घ्यायला हवं असेही राहुल यांनी सांगितले.