नवी दिल्ली : लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांनी भाजप सरकारवर जोरदार टिका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपने काँग्रेसमुक्त भारत करण्याऐवजी आधी गरीबी मुक्त भारत करावा असा टोला त्यांनी भाजपला लगावला. 


'तर देशात दोन प्रकारचे हिंदू आहेत... एक ज्यांना मंदिराचे दरवाजे उघडे आहेत असे हिंदू आणि ज्यांना मंदिराचे दरवाजे बंद आहेत असे दुसरे हिंदू... त्यामुळं हिंदू राष्ट्र बनवणारे कोणासाठी हिंदू राष्ट्र बनवणार आहेत?' असा सवालही त्यांनी यावेळी केला. 


बाबू जगजीवनराम यांच्या जीवनावर आधारित 'स्वातंत्र्यसेनानी ते उपपंतप्रधान' या पुस्तकाचं प्रकाशन मीराकुमार यांच्या हस्ते झालं. महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे डॉक्टर विकास आबनावे यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. त्यावेळी त्या बोलत होत्या.