लखनऊ : हैदराबाद मतदारसंघातून लोकसभेवर प्रतिनिधित्व करणारे खासदार आणि एआयएमआयएमचे अध्यक्ष यांच्या मागणीवर भाजपचे खासदार विनय कटीयार यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. मुस्लिमांनी या देशात राहू नये. तसेच, त्यांना वेगळा भूभाग देण्यात यावा, असेही कटीयार यांनी म्हटले आहे.


मुस्लिमांनी पाकिस्तान किंवा बांगलादेशात जावे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुसलमानांनी लोकसंख्येच्या आधारावर देशाची फाळणी करण्याचे काम केले आहे. पाळणी झाल्यानंतरही मुस्लिमांना या देशात राहण्याची मुळीच आवश्यकता नाही. त्यांनी पाकिस्तान किंवा बांगलादेशात जावे. इतकेच नव्हे तर, त्यांना (मुस्लिमाना) वेगळा भूभाग देण्यात यावा असेही कटीयार यांनी म्हटले आहे.


काय म्हणाले ओवेसी?


जातीयवादी वक्तव्ये करत भारतात राहणाऱ्या मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणणाऱ्यांना तुरूंगवासाची शिक्षा द्या. तसेच, शिक्षेचा कालावधी हा तीन वर्षांचा असावा, अशी मागणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख असदूद्दीन ओवेसी यांनी केली होती.