COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीनं आयोजित संविधान बचाव रॅलीत शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं.


गेल्या काही महिन्यांपासून देशातील विविध राज्यांमध्ये समाजातील छोट्या वर्गांवर हल्ले होत असून, त्या हल्ल्यांचं समर्थनही केलं जातंय. 


एकुणच सत्ता ताब्यात असलेल्या लोकांकडून संविधानावर हल्ला होत आहे. त्यामुळं सर्वांचं जीवन धोक्यात आलंय, अशा शब्दांत पवारांनी भाजपचा समाचार घेतला.