नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. अरुण जेटली यांच्याकडे असलेल्या संरक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळालेल्या निर्मला सीतारमन देशाच्या नव्या संरक्षण मंत्री बनल्या आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर संरक्षण मंत्रीपदी वर्णी लागलेल्या निर्मला सीतारमन या दुस-या महिला ठरल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रीमंडळ विस्तारात ९ नव्या मंत्र्यांचा समावेश झाला आहे. शिवप्रताप शुक्ल, अश्विनीकुमार चौबे, विरेंद्र कुमार, अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंग, हरदीपसिंग पुरी, सत्यपाल सिंग, गजेंद्रसिंह शेखावत, अल्फोन्स कन्ननथानम यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.


धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, निर्मला सीतारमण आणि मुख्तार अब्बास नकवी यांचं प्रमोशन झालं आहे. त्यांना कॅबिनेटमध्ये समाविष्ट केलं गेलं आहे.