पाटणा : बिहारमधील भागलपूर येथे राष्ट्रीय जनता दलाने आयोजित केलेली रॅली म्हणजे केवळ नैटंकी असल्याचा टोला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लगावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या अध्यक्षतेखाली भागलपूर येथे 'सृजन के दुर्जनों का विसर्जन' रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत लालूंनी नितीश यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. नितीश यांना सत्तेची हाव आहे. म्हणूनच ते महाआघाडीतून बाहेर पडले आणि एनडीएला मिळाले, असे लालूंनी म्हटले होते.


दरम्यान, लालूंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नितीश यांनी लालूंचा थेट उल्लेख केला नाही. मात्र, भागलपूर येथील रॅली ही नौटंकी होती, असा टोला हाणला आहे.