मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रूग्णांच्या घट होताना दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेच अनेकांनी आपले प्राण गमावले. देशात दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे बेफिकीर राहून चालणार नाही.  गेल्या 24 तासांत देशात 58 हजार 419 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 87 हजार 619 रूग्णांना डिसचार्ज मिळाला असून 1 हजार 576  रूग्णांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. 



देशात एकून कोरोना रूग्णांची संख्या 2,98,81,965 इतकी आहे. तर आतापर्यंत 3,86,713  कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 7,29,243 इतकी आहे. भारतात आतापर्यंत  27,66,93,572 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.