COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद : गोरक्षकांकडून देशभरात विविध ठिकाणी हत्या करण्यात आल्या. त्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियोजन असल्याचे आरोप एमआयएमचे अध्यक्ष खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी केला. यासाठी शनिवारी त्यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादच्या मौलाना आझाद चौक ते भडकल गेटपर्यंत खामोश मोर्चा काढण्यात आला.


मोर्चाच्या समारोपाप्रसंगी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. मोदी नेहमी सबका साथ सबका विकासचा नारा देतात. मात्र गेल्या तीन वर्षात देशात गोरक्षकांकडून 35 जणांचा हत्या झाल्या. हत्या करणा-यांविरुद्ध सरकारने कुठलेही ठोस पावलं उचलले नाही असा आरोपही केला.