न्यूयॉर्क : यूएनमध्ये पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांच्या भडकाऊ भाषणाला भारताच्या विदिशा मैत्रा यांनी 'राइट टू रिप्लाय' प्रावधानाचा वापर करत तात्काळ उत्तर दिले आहे. पाकिस्तानने यूएनमध्ये दहशतवादाला योग्य ठरवले. जगातील सर्वात मोठ्या मंचाचा पाकिस्तानने दुरुपयोग केला. पाकिस्तान असा देश आहे जो दहशतवाद्यांना पेंशन देतो. इथे १३० दहशतवाद्यांना पेंशन दिली जाते. इम्रान खान यांचे भाषण द्वेषाने भरलेले होते. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'राइट टू रिकॉल' अंतर्गत सर्व आमंत्रित सदस्य ठरलेल्या कार्यक्रमावर आपले मत मांडू शकतात. किंवा कोणत्याही भाषणाविरूद्ध आपल्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देऊ शकतात. याच प्रावधानाचा उपयोग करत भारताने पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले. पाकिस्तानच्या निती आणि खोटेपणा भारताने उघड केला. 



संयुक्त राष्ट्र महासभेत इम्रान खान यांनी आपल्या भाषणात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला.  काश्मीरमधून कर्फ्यू हटल्यानंतर इथे रक्तपात होईल. इम्रान खान यांच्या भाषणाआधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणाहून जगाला शांतीचा संदेश दिला.