नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शहा दिल्लीतील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत आहेत. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहे. गेल्या ५ वर्षातली ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली पत्रकार परिषद आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित शहा यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटलं की,' सरकारने ५० कोटी गरिबांचं जीवनमान उंचावलं आहे. जगभरात भारताचा मान वाढला आहे. देशातील सव्वा कोटी लोकांच्या मनात मोदींच्या नेतृत्वाच देश सुरक्षित असल्याची भावना आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक यशस्वी योजना आणल्या. महिलांसाठी अनेक प्रकल्प राबवले. सगळ्या वर्गामध्य़े आत्मविश्वास भरण्याचं काम सरकारने केलं आहे. या निवडणुकीत पहिल्यांदा महागाई आणि भ्रष्टाचारला मुद्दा नव्हता. जनतेमध्ये मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याची लाट होती.'


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी पत्रकाराच्या प्रश्नांना उत्तर नाही दिलं. त्यांनी म्हटलं की, 'मी पक्षाचा अनुशाषित कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष उत्तर देतील.'