मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गुजरातमधील सोमनाथ मंदिराशी संबंधित कार्यक्रमात भाग घेतला. या दरम्यान, पीएम मोदी म्हणाले की, दहशतवादामुळे विश्वास चिरडला जाऊ शकत नाही. ज्यांनी दहशतीच्या आधारावर साम्राज्य उभे केले त्यांचे अस्तित्व कायम राहत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे विधान अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या हालचालीशी जोडले जात आहे, जिथे तालिबानला थेट संदेश देण्यात आला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या अभिभाषणात म्हणाले, 'दहशतवादामुळे विश्वास ठेचला जाऊ शकत नाही. सोमनाथ मंदिर अनेक वेळा पाडण्यात आले, त्याला लक्ष्य करण्यात आले. पण प्रत्येक वेळी हे मंदिर उभे राहते आणि ते जगासाठी सर्वात मोठे उदाहरण आहे.'


पीएम मोदी पुढे आपल्या भाषणात म्हणाले, 'जे शक्तींचा नाश करत आहेत, जे दहशतवादाच्या आधारावर साम्राज्य उभारण्याचा विचार करत आहेत, ते काही काळ वर्चस्व गाजवू शकतात, परंतु त्यांचे अस्तित्व कधीही कायमचे नसते, ते अधिक दिवसांसाठी दडपू शकत नाहीत.'


अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे शासन येणार यासंदर्भात भारत सरकारकडून अद्याप कोणतेही स्थायी विधान देण्यात आले नाही. भारत सध्या अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे आणि तिचे संपूर्ण लक्ष तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यावर आहे.


तत्पूर्वी आदल्या दिवशी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांशी संबंधित एका कार्यक्रमात म्हटले होते की, काही देशांना दहशतवादाविरोधात सुरू असलेली लढाई कमकुवत करायची आहे, त्यामुळे जगाने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. परराष्ट्रमंत्र्यांनी तालिबान आणि पाकिस्तानचे नाव न घेता त्यांच्यावर हल्ला चढवला होता.


विशेष म्हणजे अफगाणिस्तानवर तालिबानचे राज्य आल्यानंतर भारताने आपल्या दूतावासातून लोकांना बाहेर काढले आहे. आता तेथे अडकलेल्या भारतीयांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारत सतत अमेरिकेच्या संपर्कात आहे, ज्याने आता काबूल विमानतळाचा ताबा घेतला आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिकेच्या दौऱ्यातून भारतात परतत आहेत.