नवी दिल्ली : दिल्लीत नागरिकत्व सुधारणा अॅक्टविरोधात वातावरण तापलंय. दिल्ली परिवहन खात्याच्या काही बसेस पेटवण्यात आल्या. जामिया मिलिया विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी आक्रमक होत हिंसक आंदोलन केलं. विद्यार्थ्यांनी दिल्लीत नागरिकत्व सुधारणा अॅक्टविरोधात मोठी रॅली काढली... आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर विद्यार्थी हिंसक झाले आणि जाळपोळीला सुरुवात झाली. या आंदोलनादरम्यान  बाटला हाऊस, जाकिर नगर, शाहीन बाग या परिसरात बंद पाळण्यात आला.