नवी दिल्ली : देशाची सत्ता हातात येईपर्यँत स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी कधीही तिरंग्याला वंदन केले नव्हते, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. गुरूवारी दिल्लीत कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संमेलनात ते बोलत होते. या संमेलनात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग देखील उपस्थित होते. यावेळी राहुल गांधींनी आपल्या भाषणात संघातील नेत्यांवर जोरदार टीका केली. 

 



संघाने संपूर्ण देश १५-२० व्यापाऱ्यांच्या हातात दिला असून तेच लोक हा देश चालवतात. 'मेक इन इंडिया' चे उद्देश संपूर्णपणे फसले आहे. संसदेत मंत्र्यांनी सांगितले की, १ लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. परंतू, २ कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचे त्यांनी वचन दिले होते.